
उजनीच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घ्यावा. रणजीत सिंह मोहिते पाटील
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
उजनी धरणावर सुमारे १०० हून अधिक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत.त्यात पुढील वर्षी उजनीतील ७ TMC पाणी मराठवाड्यात जाणार आहे तसेच या डिसेंबर अखेरीस y२ TMC पाणी घाटणे बंधाऱ्यात जाणार असल्याने उजनीच्या पाण्याचा तुटवडा वरचे वर वाढत जाणार आहे.तसेच समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असल्याने भीमा नदीला आणि कालव्याला पाणी सोडण्यासाठी मर्यादा येणार आहेत,त्यासाठी पाण्याची पळवापळवी रोखावी लागेल यासाठी उजनीचे पाणी शेतकऱ्यांनी आरक्षित करणे गरजेचे आहे त्यासाठी जास्तीत जास्त पाणीवापर संस्थांची नोंदणी करणे काळाची गरज आहे.या पार्श्वभूमीवर उजनी लाभक्षेत्रातील मोहोळ व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांशी मौजे कामती येथे उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संवाद साधला.प्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचीही उपस्थिती होती.
या बैठकीत मा.रणजीतदादांनी पाणी नियोजनासाठी आता शेतकऱ्यांनीच पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री.वसंतनाना देशमुख, मनोहर भाऊ डोंगरे,बाबासाहेब शिरसागर,अनिल सावंत, राजशेखर पाटील,अस्लम चौधरी,विनय पाटील,दीपक गायकवाड,सीमाताई पाटील,मानाजी बापू माने,कामतीचे सरपंच प्रवीण भोसले,डॉ.सर्वळे,अच्युत पाटील,रणजीत चवरे,ॲड.पवन गायकवाड,विजय कोकाटे,विजय बुरकुल,शिवशंकर कावचळे,भारत पाटील,काशीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
