पंढरपूर दि.13:- कार्तिक यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीनी कोणतेही अडचण येऊ नये तसेच यात्रा सुरळीत पार पाडण्याठी पंढरपूरात पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. या सर्व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कामकाज जलद व सुरळीत व्हावे यासाठी सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे मध्यवती आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
कार्तिक यात्रा कालावधीत पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदीर व नगरपालिका या ठिकाणी पाच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आली. भाविकांना यात्रा कालाकावधी कोणतही अडचण आल्यास संबधित विभागाचे विभाग प्रमुख मध्यवर्ती नियंत्रण कक्षातुन तात्काळ निराकण करणार आहेत. भाविकांनी यात्रा कालावधीत काही अडचणी आल्यास मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्या 02186-222952 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.