विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अर्ज छाननी दिवशी अभिजीत पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे यामुळे अभिजित पाटील यांच्या गटात एकच खळबळ उडाली आहे
अभिजीत पाटील हे चार साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्यामुळे उमेदवारी अर्जावर आक्षेप आल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे अभिजीत पाटील हे भगिरथ भालके यांचे प्रमुख विरोधक मानले जात असल्याने त्यांच्या विरोधात भालके समर्थक धनाजी घाडगे यांनी आक्षेप घेतल्यामुळे त्यांचा अर्ज बाजूला ठेवण्यात आला आहे थोड्याच वेळात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.