सामाजिक समता कार्यक्रमाचा स्वच्छता अभियानाने समारोप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाने ६ ते १६ एप्रिल दरम्यान सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आज कार्यक्रमाचा समारोप विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला.

सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त १० दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले. आज सकाळी आठ वाजता बुद्ध विहार, महात्मा फुले वस्ती, मोदीखाना सोलापूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीमध्ये स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

स्वच्छता अभियानामध्ये बार्टीच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता सोनकांबळे, समाज कल्याण निरीक्षक राहुल काटकर, छनुसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड, कार्यालयातील सर्व कर्मचारी, समतादूत व तालुका समन्वयक सहभागी झाले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here