जुनोनी गावाजवळ आज सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. यावेळी झालेल्या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. वारकऱ्यांना धडक देणाऱ्या टाटा नेक्सॉन कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारमधील व्यक्ती या सांगोला तालुक्यातील सोनंद या गावातील रहिवासी आहेत.
दरम्यान, या अपघातात विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्यांनी आपले प्राण गमावल्याने करवीर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघाले होते.
सांगोला- आज जुनोनी बायपास रोडला सांयकाळी 7वाजण्याच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगाने जाणाऱ्या MH-13-DE-7938 या कारने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत गाडी घुसवली यामुळे 32वारकऱ्यापैकी 7वारकरी जागेवर मुखी पावले.यामध्ये शारदा आनंदा घोडके, सुशीला पवार, रंजना बळवंत जाधव, गौरव पवार, सर्जैराव जाधव, सुनिता सुभाष काटे, शांताबाई शिवाजी जाधव हे रा.जाठारवाडी ता.करवीर जि.कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
यावेळी यांचा मुक्काम जुनोनी गावाच्या जवळ असणाऱ्या श्रीराम वस्तीवर होणार होता. परंतु काळाने घाला घातला व अलीकडे हा अपघात घडला.अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्ताचा व मांसाचा सडा पडला होता. व सर्वत्र रडण्याचा आवाज मोठ्या प्रमाणात येत होता.
या अपघाताची माहिती मिळताच ताबडतोब सांगोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मात्र वाटेत सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ चालत असताना आज सायंकाळच्या सुमारास एक भरधाव कार थेट दिंडीत घुसली. यावेळी झालेल्या अपघातात तब्बल १५ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून ८ जणांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे.