शेतकऱ्यांना समस्या बरोबर शेत मजुरांचीही प्रश्न शिवसेना मार्गी लावणार :- खासदार संजय राऊत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शेतकऱ्यांना समस्या बरोबर शेत मजुरांचीही प्रश्न शिवसेना मार्गी लावणार :- खासदार संजय राऊत

 

सोलापूर // प्रतिनिधी 

शेतकऱ्यांच्या समस्या व संकटे वाढतच चालले आहेत . यास अनियमित निसर्गाचे कारण असून तरीही शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांचे संकटे सोडविण्या बरोबर महाराष्ट्रातील शेतमजुर व असंघटीत कामगारांच्या समस्या शिवसेना मार्गी लावणार असे आश्वासन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले .
ऑल इंडिया भारतीय कामगार संघटना महासंघ संलग्न महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी मुंबई येथील शिवसेना भवनात मा . श्री . संजय राऊत साहेबांना एका निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील शेतमजुर व असंघटीत कामगारांच्या समस्या सोडविण्याचे निवेदन दिले त्यावेळी मा . श्री . संजय राऊत साहेबांनी वरील आश्वासन दिले .
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा . संजय राऊत साहेब यांना दिलेल्या निवेदनात शेतात काम करणाऱ्या शेतमजुर स्त्री , पुरुष कामगारांना कुठल्याही प्रकारचे हक्क व कायदे नसल्याने शेतमजुरांचे जीवन अत्यंत गंभीर झाले असून त्यांना न्याय व कायदेशीर शेतमजूर म्हणून शासनदरबारी होणे गरजेचे आहे . याचा विचार करुन मी विष्णु कारमपुरी ( महाराज ) सन २०१७ मध्ये शेतमजुर बचाव संघर्ष यात्रा संपूर्ण महाराष्ट्र काढण्यात आले . आणि सन २०१८ मध्ये चला विधान सभेवर भगवा फडकवूया अशी यात्रा काढली . या माध्यमातून शेतमजुरची संघटना बांधली त्यावेळी त्या त्या जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी , कुठल्याही प्रकारची सहकार्य केले नाही . उलट तुम्ही का ? इकडे आलात शिवसेना भवनातून आदेश घेऊन या असे म्हणून परत पाठवुन दिले .
महाराष्ट्रातील सर्व शेतमजुरांना एकत्र आणून शिवसेना पक्षांच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २० ते २५ आमदार शिवसेनेचे जास्त निवडुन येऊ शकतात म्हणजेच शिवसेनेचा स्वंतत्र पणे भगवा फडकल्या शिवाय राहत नाही अशी माझी खात्री आहे . याबाबत मी गेल्या ३ ते ४ वर्षापासून शिवसेनेच्या वरीष्ठ पदाधिकारी म्हणजे मा . अनिल देसाई साहेब , मा . सुर्यकांत महाडिक साहेब व शिवसेना नेते यांना संपर्क साधून व प्रत्यक्ष भेटून शेतमजुर व असंघटीत कामगार सेना स्थापना करणेबाबत विचारले परंतु कोणीही या विषयाकडे गांर्भीयाने पाहिले नाही .
तरी माननीय आपण शिवसेना नेते या नात्याने शेतमजुर व असंघटीत क्षेत्रात काम करण्यासाठी भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून शेतमजुर व असंघटित कामगार सेना स्थापना करण्यास मान्यता द्यावी . ही नम्र विनंती . असे नमुद करण्यात आले .
मा . संजय राऊत साहेब यांना विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात विठ्ठल कुऱ्हाडकर , श्रीनिवास चिलेवरी , सौदप्पा जंगडेकर यांचा सहभाग होता .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here