विजापूर महामार्गावर चारचाकी वाहन धडकल्याने चौघांचा मृत्यू!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर-विजापूर महामार्गावरील कवठे गावाजवळील ब्रिजला धडकून कारमधील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात आज बुधवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. अपघातातील मयत व जखमी हे सर्व कर्नाटकातील आहेत.
अरुण कुमार लक्ष्मण (वय 21), महीबूब मोहम्मद अली मुल्ला (वय 18), फिरोज सैफनसाब शेख (वय 20), मुन्ना केंभावे (वय 21, सर्व राहणार यरकल केंडी, तालुका सिंदगी, जिल्हा विजापूर, अशी अपघातात मरण पावलेल्याची नावे आहेत.

 

या अपघाताची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार आर. ए. जाधव यांनी घटनास्थळी जाऊन सर्व जखमी यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, चौघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टर रोहित पाटील यांनी सांगितले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here