वाचन, संशोधन आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा वापर करून विद्यार्थ्यानी यश खेचून आणावे : यतीन शहा, संस्थापक प्रिसीजन कॅमशाफ्ट ली. कर्मयोगीचा कॅम्पस म्हणजे नंदनवन. “कर्माटेक 2K22” चे शानदार उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

वाचन, संशोधन आणि आत्मविश्वास या त्रीसुत्रींचा वापर करून विद्यार्थ्यानी यश खेचून आणावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी मनामद्धे न्युनगंड न बाळगता कठोर परिश्रमाच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण करावीत असे. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी बदलत्या तंत्रज्ञाना बरोबर स्वत:चे ज्ञान विकसित करावे असे प्रतिपादन प्रिसीजन कॅमशाफ्ट ली. कंपनीचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योजक श्री. यतीन शहा यांनी केले. कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालायचा कॅम्पस पाहून मी भारावून गेलो अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली. 14 मे रोजी कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये आयोजित केलेल्या “कर्माटेक 2K22” या राज्यस्तरीय तंत्र परिषेदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते तसेच श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांचे व्यवस्थापन कौशल्य व कामकाज यांचे श्री यतीन शहा यांनी विशेष कौतुक केले. श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कर्माटेक 2K22 तंत्र परिषदेला ला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी करून स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कर्माटेक 2K22 तंत्रपरिषदेचे संयोजक व महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी पाहुण्यांची ओळख करून देऊन “कर्माटेक 2K22” कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला. सदरच्या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे माननीय आतिथी म्हणून उपस्थित होते.
14 मे 2022 रोजी कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, मोडेल मेकिंग, माइंड स्पार्क, प्रोजेक्ट एक्सिबीशन , सर्किट सुडोकू अश्या विविध राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील पाचशे हून अधिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना सुमारे वीस हजारहून अधिक रुपयाची बक्षिसे विजेत्यांना प्रदान करण्यात आली. कोरोंनातून आता आपण सावरलेलो आहोत त्यामुळे येत्या काळात अधिक परिश्रम करून विद्यार्थ्यानी आपले शैक्षणिक नुकसान भरून काढावे असे आवाहन डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी आपल्या भाषणामद्धे कोरोंना काळामद्धे केलेल्या ज्ञानदानाबद्दल सर्व प्राध्यापक वर्गाचे विशेष कौतुक केले. कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोंना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले असून या कोरोंना काळातील कर्मयोगीचे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या ज्ञांनामद्धे कधीही कुठेही कमी पडणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यामद्धे ही कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये असे अनेक उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी दिली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजीस्ट्रार जी डी वाळके, उप पप्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. समन्वयक प्रा.योगेश घोडके, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मृणालिनी कोकणे, मयूरी मोहिते, साक्षी जत्राते व अंजली कुणाले या विद्यार्थिनिं केले. प्रा. राहुल पांचाळ यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here