रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने काँग्रेसच्या विजयाची नांदी- संग्राम जाधव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

२१५ कसबा पुणे विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची नांदी निर्माण झाल्याची भावना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेल जिल्हाध्यक्ष संग्राम सुभाष जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी व्यक्त केली.

कसब्यातील विजयाने महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. या निवडणुकीतील विजयाने महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या विजयाचे पर्व सुरु झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारला जनतेने पूर्णपणे नाकारल्याचे स्पष्ट होत आहे. नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात प्रचंड प्रमाणात उलथापालक झाली असून शिंदे-फडणवीस सरकारने लोकशाहीचा गळा कापला आहे. कसब्यातील विजयाने शिंदे-फडणवीस सरकारला जनतेने मोठी चपराग दिल्याचे स्पष्ट होत आहे. भविष्यात शिंदे-फडणवीस सरकारला जनतेच्या जनतेच्या शापाला सामोरे जावे लागणार आहे.
यावेळी कसब्यातील जनतेचे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम सुभाष जाधव यांनी आभार व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here