(विविध महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपुरात भव्य विराट मोर्चा)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सरकारने एस.टी.कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे याबाबत गेले अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू याबाबत गांभीर्याने विचार करावा तसेच काही दिवसांपूर्वी
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी त्याचप्रमाणे ओ.बी.सी.चा एमपेरिकल डाटा त्वरित करून कोर्टात सादर करावा आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करू नये या व अशा विविध महत्त्वपूर्ण प्रमुख मागण्यांसाठी पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 16
डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथील तहसील कार्यालय पर्यंत भव्य विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे राज्याचे नेते दिलीप (बापु) धोत्रे यांनी दिली.
याप्रसंगी पंढरपुर शहर व तालुक्यातील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.