नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील श्री.बाळू महादेव माळी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन मा.श्री.अनिल(दादा) सावंत यांनी केली. यावेळी या दू:खद प्रसंगी सहवेदना व्यक्त करून माळी कुटुंबास या दू:खातून सावरण्याचे बळ मिळो अशी त्यांनी प्रार्थना केली
श्री.बाळू महादेव माळी कुटुंबाचे जे नुकसान झाले आहे ते कधीच न भरून निघणारे आहे, ही घटना खरोखरच मानवतेच्या धर्माला आणि सामाजिक एकरूपतेला काळिमा फासणारी आहे असे यावेळी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन मा.श्री.अनिल(दादा) सावंत म्हणाले.
भैरवनाथ शुगर चे संस्थापक मा.नामदार.प्रा.डॉ.श्री.तानाजीराव सावंत साहेव (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य) व भैरवनाथ शुगरचे चेअरमन मा.प्रा.श्री.शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर हा नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आला आहे. त्याच बांधीलकीतून आज असून फूल ना फुलाची पाकळी या भावनेतून भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन मा.श्री.अनिल(दादा) सावंत यांनी यावेळी श्री.बाळू महादेव माळी कुटुंबाला रु.एक लाखाची आर्थिक मदत जागेवरच देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळेस शिवसेन तालुका अध्यक्ष मा.श्री. अशोक चौंडे,श्री बंडू जाधव,श्री.लवटे अण्णा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.