अन्यथा परिणामांना सामोरे जा
पुरोगामी संघर्ष परिषदेचा इशारा
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन साठी सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून प्रभाकर भैया देशमुख जर आवाज उठवत असेल आणि हा चळवळीचा आवाज 353 नावाच्या कलमाखाली जर दाबला जात असेल तर हे शासन चळवळ मोडीत काढत आहे हे सरळ सरळ उघड सत्य असून देशमुख यांच्यावरचे 353 कलम जर मागं घेतलं नाही तर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून प्रभाकर भैय्या देशमुख यांचे साठी शेतकरी व चळवळीतील कार्यकर्ते टोकाचा लढा देतील त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा खणखणीत इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष माननीय कृष्णाजी गायकवाड व सोलापूर जिल्हा युवकचे जिल्हाध्यक्ष माननीय विलास वसेकर यांनी संयुक्त दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात कृष्णाजी गायकवाड व विलास वसेकर पुढे म्हणाले की, भविष्यात जर चळवळीच्या नेत्यांचा असा आवाज दाबला जात असेल तर हे शासन कोणासाठी काम करते असा आम्हाला प्रश्न पडला आहे. त्यासाठी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर येतील आणि याचे सगळे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे.