पंढरपूर भाजप कार्यकर्त्यांकडून शिवाजी चौकात मिठाई वाटून जल्लोष

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील चार राज्यात बहुमत मिळवत, संन्यास्थापनेचा मार्ग सुकर केला आहे. चारही राज्यांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या यशाचे श्रेय सर्वसामान्य जनतेला जाते. परिवार वाद वंशवाद जाती- धर्माचे समीकरण बाजुला ठेवून जनतेने भाजपला चारी राज्यात बहुमत दिले असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालूका यांच्या वतीने विधानपरिषदेचे मा. आमदार प्रशांतराव परिचारक याच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक येथे लोक विजयाचा जल्लौष साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे जिलेबी वाटून घोषणाबाजी व फटाक्यांच्या आवाजात मोठ्या उत्साहाने नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पंढरपूर येथील जनता यांच्यासमवेत आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी युवक नेते प्रणव परिचारक, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तात्या धनावडे, ज्येष्ठ नेते दिगंबर कांबळे सर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य शकुंतलाताई नडगिरे, प्रदेश किसान मोर्चाचे माऊली हळणवर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुभाष मस्के सर, संदीप माने, तालुका अध्यक्ष भास्कर दादा कसगावडे, शहराध्यक्ष विक्रम शिरसाट, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्राजक्ताताई बेणारे शहरातील व तालुक्यातील विविध पदाधिकारी व तालुक्यातील विविध पदाधिकारी व तरुण कार्यकर्ते सहकारी मित्र, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here