नवरात्रात महिलांच्या आरोग्याचा जागर (सार्वजनिक आरोग्य विभागाचे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सुदृढ समाजासाठी महिलांचे आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विषय आहे . कुटुंबाची काळजी घेणारी महिला कामकाज व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष्य देऊ शकत नाही . ती निरोगी राहावी , जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी, यासाठी नवरात्र उत्सव दरम्यान “माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” हा आरोग्य तपासणी उपक्रम मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान या आदरयुक्त भावनेतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने माता भगिनीसाठी राबविण्यात येत आहे .”

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येतात या योजनांना लोकसहभाग मिळावा व मातृत्वाचा सन्मान व्हावा यासाठी व माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव कालावधीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान कालावधीत राज्यातील अठरा वर्षावरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेत ठेवण्यात आले आहे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा लोकोपयोगी उपक्रम सार्वजनीक आरोग्य विभागाने नवरात्र उत्सवाचे निमित्य साधून आखला आहे.

महिला घराचा केंद्र बिंदू असते. हाच मुद्दा समोर ठेवून महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी हे विशेष अभियान माता भगिणीसाठी राबविण्यात येत आहे. नवरात्र उत्सवाच्या काळातील या अभियानात आरोग्य विभागाबरोबरच महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, शालेय शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग यांचाही सहभाग घेतला जाणार आहे.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यासाठीही सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, आरोग्य सेवक, सेविका, आशाताई यांनाही माननीय आरोग्य मंत्री यांनी आव्हानपत्रे पाठविली आहेत. तसेचआरोग्य सेवा आयुक्त यांनी या मोहिमेबाबत करावयाच्या कार्यवाही बाबत मार्गदर्शक पत्र सर्व जिल्ह्यांना जारी केले आहेत .
अभियानात सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत अठरा वर्षावरील महिलांची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज माता आणि महिलांच्या तपासणीची शिबिर घेण्यात येतील. उपकेंद्र आणि आरोग्य वर्धिनी केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी मार्फत मातांची तपासणी, समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि त्यावरील रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ मार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रम अंतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

या अभियानात महिलांच्या वजन, उंची, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण याबाबतच्या चाचण्या घेण्यात येतील. आवश्यक वाटल्यास रक्ताच्या चाचण्या, छातीचे एक्सरे आणि इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. कर्करोग, रक्तदाब, मधुमेह याबाबत चाचणी घेतली जाईल. माता आणि बालकांचे लसीकरण केले आहे का याचीही तपासणी केली जाणार आहे.

या अभियानात पोषण, बीएमआय आटोक्यात ठेवावा, मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती याबाबत समुपदेशन केले जाणार आहे.

*चौकट-*

आरोग्य विभागाच्या भरारी पथकांव्दारे आदीवासी क्षेत्रात तपासणी करणार

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेच्या डॉक्टरांकडून गावातील महिलांची तपासणी आणि समुपदेशन केले जाणार.

गावातील अंगणवाडी केंद्रात आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहेत . यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी स्वयंसेविका यांच्या सहकार्याने आयोजन केले जाणार.

अभियानात तीन दिवस गर्भवतींच्या सोनोग्राफी करून तपासणी केली जाणार आहे . अधिकाधिक माता भगिनींनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

-प्रा.डॉ.तानाजी सावंत

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here