(शंभर जनांना दाखवला “द काश्मीर फाईल्स” चित्रपट!)
“द काश्मीर फाईल्स” चित्रपटामुळे काश्मीरचा खरा इतिहास सर्वांसमोर आला:- पृथ्वीराज महाडिक
कोल्हापूर येथे धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने शंभर तरूणांना “द काश्मीर फाईल्स” या वास्तवदर्शी चित्रपट दाखवण्यात आला आहे.
दुसरा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीर येथे घडलेल्या सत्य घटनेवर आधारित असलेला दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
सत्य घटनेवर आधारित असलेला काश्मीरी पंडितांवर झालेला अन्याय अत्याचार कशा पद्धतीने झाले हे या चित्रपटात दिग्दर्शकांनी दाखवले हेच सत्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी प्रचंड गर्दी होताना दिसत असल्याचे धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष मा.पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितले.
भारताचा स्वर्ग आणि काश्मिरी पंडितांची माय भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मीर खो-यातून कश्मीरी पंडितांना परागंदा व्हावं लागलं 1990 च्या दशकात काही सामुदायांकडून काश्मिरी पंडितांना वर प्रचंड अत्याचार झाले. पंडितांना काश्मीरमधून हाकलून लावत त्यांच्या भूमीवर अतिक्रमण करण्यात आलं. हिंदू पंडितांची घर बळकावण्यात आली. कश्मीरी पंडित अन्वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, द कश्मीर फाईल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक करत,
काश्मिरी पंडितांना वर झालेल्या अन्यायाच्या वाचा फोडणारा विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शन केलेला नुकताच दिनांक 11 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या चित्रपटाचे कौतुक केले असून काश्मिरी पंडित आजपर्यंत झालेल्या अन्यायाचा सर्वांसमोर येणे गरजेचे होते असे मत त्यांनी व्यक्त केले आहे ह्या चित्रपट व काश्मीर मध्ये झालेल्या काश्मीर पंडित आणि वर अन्याय सर्वांना माहिती व्हावा या उद्देशानेच धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील मल्टिप्लेक्स सिनेमा ग्राम मध्ये 100 हून अधिक सर्व कोल्हापुरातील तरुणांना हा चित्रपट दाखविला.
यावेळी धनंजय महाडिक युवाशक्ती अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितले की काश्मीर चा खरा चेहरा व इतिहास व त्यांच्यावर झालेला अन्याय चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर आले असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले.
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय अन्य लोकांसमोर येण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.