देगाव शाखा कालव्यासाठी उर्वरित 300 कोटींचा निधी कधी देणार?

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

विधानसभेत आ. सुभाष देशमुखांची विचारणा

  

अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील देगाव शाखा कालव्याचे काम निधी अभावी अपूर्ण आहे. यासाठी 476 कोटींचा निधी हवा आहे. मात्र सध्या केवळ 74 कोटीच प्राप्त झाला आहे. त्यामुळे हे काम अपूर्ण आहे.  उर्वरित 300 कोटींचा निधी कधी देणार, या दिरंगाईला जबाबदार कोण, त्यांच्यावर कारवाई करणार का, अशी विचारणा आ. सुभाष देशमुख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे विधानसभेत केली.
 अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनता ज्या देगाव एक्सप्रेस कॅनॉल  योजनेसाठी आतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे. याला तिसर्‍या सुधारित मान्यता 476 कोटींना दिली आहे. तिसर्‍या मागणीला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.  त्याला आतापर्यंत 70 कोटींची तरतूद दिल्याचे आणि   2024 पर्यंत हे काम पूर्ण होण्याचे सांगण्यात येते.  मात्र काम पूर्ण होण्याची मुदत दोन वर्षच राहिली आहे. 70 कोटीमध्ये हे काम पूर्ण होणे शक्य नाही. दोन वर्षात या कामासाठी उर्वरित 300 कोटींचा निधी उभा करणार का?  असा प्रश्‍न आ. देशमुख यांनी विचारात या कामात दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आ. देशमुख यांनी केली.  
 चौकट
 पाठपुरावा सुरूच ठेवणार
 देगाव शाखा कालव्याचे  काम पूर्ण करण्यासाठी निधी वाढविण्यासाठी आपला प्रयत्न सुरू राहणार आहे. याकडे  जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here