केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेली प्रचंड महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ व जीवनावश्यक आणि शालेय वस्तूवरील वाढवलेल्या जीएसटी, शेतकऱ्यांना मदत, पीककर्ज माफ करावे ,फळ बागायतदारांना भरिव मदत करावी, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी ७५ हजार रुपये आर्थिक मदत करावी आशा आशयाचे निवेदन दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने मा. नायब तहसिलदार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भिमाशंकर जमादार,जिल्हा सरचिटणीस प्रा.सिद्राम सलवदे , सुलेमान तांबोळी, व्हि.जे एन टी सेलचे अध्यक्ष हरिश्चंद्र राठोड ,जि.प.सदस्य राजू गायकवाड ,अभिराज शिंदे,सुभाष चव्हाण ,प्रा.भोजराज पवार,जिल्हा उपाध्यक्ष धनराज जमादार,तालुका प्रसिद्धी प्रमुख अशोक कस्तुरे,दत्तात्रय गजबार, विनोद रणसुरे ,राजु भोई,उत्तमकुमार वाघमारे,कुंडलिक जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.