जनता दरबारामध्ये नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक हाच प्रमुख उद्देश:उमेश(दादा) पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(माझ्या कार्यकर्त्याला त्रास झाल्यास मला संपर्क करावा:उमेशदादा पाटील)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पेनुर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश दादा पाटील यांच्या वरकुटे,शेजबाभुळगाव येथील जनता दरबाराला नागरिकांनी आपल्या विविध अडचणी व अनेक प्रश्न मांडत ग्रामस्थांची लक्षणीय प्रतिसाद दिला.

यावेळी उमेश दादा पाटील बोलताना म्हणाले की; जनता दरबाराच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्न अडचणी सोडविणे हाच उद्देश आहे.कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता, राजकारण न करता आम्ही तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा ग्रामस्थांना विश्वास दिला.
यावेळी त्यांनी वरकुटे गावांमध्ये मी पहिल्यांदा जरी आलो असलो तरी मी मोहोळ तालुक्यातील नरखेड चा रहिवासी असून सर्व गोरगरीब दीनदलित दुबळ्या लोकांचे प्रश्न जनता दरबाराच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी उमेश दादा पाटील यांनी बोलताना दिली. सर्व शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा, कमी करण्यासाठी मी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगितले.

यावेळी मोहोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजी बापू माने, मोहोळचे मा.नगराध्यक्ष रमेश बारसकर,अशोकतात्या क्षिरसागर, भीमाचे माजी संचालक प्रकाशनाना बचुटे,मामा दाइंगडे,विकील दमन चव्हाण, अक्षय गायकवाड, संतोष बचुटे, वरकुटे व शेजबाभुळगाव येथील सर्व ग्रामीण भागातील नवतरुण युवक राष्ट्रवादी काँग्रेस वर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here