उत्पादक शेतकरी यांची तोडणी मजुरांकडून होणारी आर्थिक पिळवणूक व ऊस जळीताचे सत्र कमी करणे करीता ऊस तोडणीस प्रति मे.टन 50 रु आगाऊ रक्कम जाहीर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कारखान्याचा गळीत हंगाम 2021-22 हा अंतिम टप्प्यात आलेला असून, यापुढे सर्वसाधारण एक महिन्यापर्यंत गळीत हंगाम सुरु राहणार आहे. ऊस तोडणी करणाऱ्या तोडणी मजूर यांचेकडून ऊस उत्पादकांची ऊस तोडणी करीता आर्थिक अडवणुक होत असलेचे व विनाकरण ऊस जळीत करुन आणणेचे प्रमाण वाढु लागलेचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने चालु गळीत हंगाम 2021-22 मध्ये दि. 01/04/2022 पासून ऊस तोडणी करणाऱ्या सर्व ट्रक/ट्रॅक्टर टोळ्या, टायर बैलगाडी व ट्रॅक्टर गाडी (बजाट) यांना रु.50/- प्रति मे.टन इतकी आगाऊ तोडणी रक्कम देणेचे निश्चित केलेले असून याकरीता ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडुन ऊस तोडणीकरीता आगाऊ रक्कम घेवू नये. तसेच कोणत्याही परिस्थितीत ऊस जळीत करुन तोडु नये या निकषांचे तोडणी ठेकेदाराकडुन तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे माहे एप्रिल महिन्यातील वाढत्या ऊन्हाच्या तीव्रतेमुळे ऊस तोडणी मजुरांची कार्यक्षमता कमी झालेमुळे ऊस तोडणी कमी होत आहे. याचा विचार करुन कारखाना व्यवस्थापनाने दि.25/03/2022 पासून जे ऊस उत्पादक शेतकरी स्वत: मालकतोड करुन ऊस पुरवठा करतील अशा शेतकऱ्यांना कमिशनसह रु.400/- प्रति मे.टन प्रमाणे ऊस तोडणी दर देणेचे धोरण जाहीर केलेले आहे. तरी जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस स्वत: मालकतोड करुन कारखान्यास पाठवावा असे आव्हान कारखान्याचे चेअरमन आमदार मा. श्री. प्रशांतराव परिचारक यांनी केलेले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. श्री. कैलासराव खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी “शेतकरी हिताय कामगार सुखाय” या व्दिसुत्रीचा कायमच अवलंब केलेला असून शेतकऱ्यांना नेहमीच विविध प्रकारे सहकार्य करण्याची भूमिका ठेवली होती. त्याचप्रमाणे आमदार मा. श्री. प्रशांतराव परिचारक यांनी देखील ऊस उत्पादकांची ऊस तोडणी करीता असणारी तळमळ लक्षात घेवून आगाऊ प्रति मे. टन 50 रुपये इतकी रक्कम तोडणीकरीता जाहीर केलेली असून यामध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासन्याचे काम होणार आहे असे प्रतिपादन कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी यांनी केले.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकरराव मोरे, श्री.वसंतराव देशमुख, श्री.उमेशराव परिचारक, श्री.दिलीप चव्हाण, श्री.हरीष गायकवाड, श्री. ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री. बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.हणमंत कदम, श्री.किसन सरवदे, श्री. शामराव साळुंखे, श्री.राणु पाटील, आदि उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here