ईश्वर वठार व आजुबाजुच्या वाडया-वस्त्यावर जाणा-या मार्गावर पाणी असल्यामुळे संपर्क तुटला:-माऊली हळणवर

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ईश्वर वठार गावाला जोडणा-या जिल्हा मार्ग क्रमांक 29 या मार्गावरील वाड्यावर पाणी असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला
ईश्वर वठार -बिटरगाव हा जिल्हा मार्ग असून या मार्गावरून बिटरगाव ,अजनसोड ,
सुस्ते ,मुंढेवाडी, येथील लोकांना ये जा करावी लागते. ईश्वर वठार गावाच्या जवळ एक ओढा आहे या वड्याची उंची कमी असल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून हा पूल पाण्याखाली गेला आहे शाळेला जाणारी लहान मुलं गरोदर माता भगिनी यांना नेआण करणे मोठे जिकरीचे झाले आहे माढा मतदारसंघाचे आमदार गेल्या अनेक वर्षापासून या फुलाची उंची वाढवण्यासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन नेहमी देतात व मतदान झाल्यानंतर याकडे लक्ष देत नाहीत म्हणून बबन दादा शिंदे यांचा जाहीर निषेध करून त्यांना या भागात फिरू देणार नसल्याचे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here