ग्रामीण जागरूकता अभियान कृषीकन्या मानसी गोडसे यांनी ग्रामीण भागात रजविले!
सोलापूर // प्रतिनिधी
भारत हा कृषिप्रधान देश आहे तसेच कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे पण डिजिटल शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया आहे असे मत कृषीकन्या मानसी मधुकर गोडसे हिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित,रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत व्यक्त केले.
मानसी हिने शेतीविषयक ॲप शेतकऱ्याच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ॲप विषयी पुर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली त्यामध्ये तिने कृषी नेटवर्क ॲप, कॅटल मॅनेजर ॲप,फुले जल ॲप याविषयी माहिती देताना ॲप मध्ये असलेले सर्व मुद्दे जसे की हवामानाचा अंदाज कसा पहावा,पिकांवर येणारे रोग,कीड याचे व्यवस्थापन ॲप च्या साहाय्याने कसे करावे, गायींच्या दैनंदिन दुधाचे संकलन कसे करावे,शेतातील पाणी व्यवस्थापन कसे करावे,ॲप मध्ये सर्व माहिती कशी भरावी याबद्दल प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले त्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत,प्रा. डी. एस. मेटकरी,प्रा. एस.एस.भोसले,प्रा.डी.एस.ठवरे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी कान्हापूरी गावातील प्रगतशील शेतकरी पोपट फराडे,संतोष फराडे, सोमनाथ गुलाब शिंदे,शुभम फराडे, सोमनाथ श्रीरंग शिंदे इ शेतकरी उपस्थित होते.