कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक

कोल्हापूर : राज्यातील 21 जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा पाच टक्क्यांहून कमी असताना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. कोल्हापुरचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा 11 टक्के, सांगलीचा 10 टक्के तर साताऱ्याचा 9.75 टक्के इतका आहे. कोल्हापुरचा विचार केला तर गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची रोजची आकडेवारी ही 1500 ते 2200 पर्यंत वाढत आहे.

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यासाठी निर्बंधांचे पालन करण्याऐवजी नागरिकांकडून करण्यात येणारा हलगर्जीपणा हा अधिक जबाबदार असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here