प्रतिनिधी – लक्ष्मण राजे
मुंबई:- मुंबई, महाराष्ट्रात पावसाळी पुराने जनजीवन उध्वस्त झालेले आहे.तसेच कोकणात घर, दुकाने, रस्ते सर्वच जमीनदोस्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत.जखमी झाले आहेत.तसेच कित्येक नागरीक अजून बेपत्ता आहेत. अशा भयंकर, दुर्दैवी परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना,”तुम्ही स्वतःला सावरा, बाकी सरकारवर सोपवा” असा दिलासा दिला आहे. विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, आपआपल्या परीने शक्य होईल तेवढे जीवनावश्यक वस्तू , भांडी, अन्नधान्य, कपडे इत्यादी साह्य करीत आहेत. तरी अशा कठीण परिस्थीतीमध्ये, मुंबई महाराष्ट्रातून लाखो, करोडो रुपये कमावणाऱ्या बाॅलिवूडच्या चित्रपट तारे तारका, खेळाडू, उद्योगपती यांनी आपणहून आर्थिक सहाय्य देऊन पूरग्रस्तांना दिलासा द्यावयास हवा. तसेच सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी आपले एक दिवसाचे वेतन देऊन पूरग्रस्तांना मदत करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कदम यांनी केली आहे.