संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याच्या ‘श्रीं’च्या जरीपटक्याच्या अश्वांचे, पेठवडगांव, उजळाईवाडी इथे जंगी स्वागत!
कोल्हापूर // प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्यात कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील अंकली इथल्या श्रीमंत शितोळे सरकारांच्या अश्वाचा परंपरेनुसार मान आहे. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शुद्ध एकादशीला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य सप्तमीला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात माऊलींच्या रुपात सहभागी असतो. पालखी सोहळा, ऊन-वारा-पाऊस, गर्दी यासारख्या सर्व संकटांचा सामना करत पालखी सोहळ्यात सहभागी होत असतो. पालखीत सामील होणाऱ्या अश्वाचे मुख्य आकर्षन रिंगन सोहळा असते. गोल रिंगणात अभंग आणि टाळ मृदंगाच्या नादात घुंगराच्या खुळखुळ आवाजाच्या नादावर हा अश्व रिंगनमध्ये सहभागी होत असतो.वर्षी पायी पालखी सोहळा न निघाल्याने श्री क्षेत्र आळंदी येथून पालखी प्रस्थानानंतर एकादशीपर्यंत आळंदी येथेच मुक्कामास असणाऱ्या या अश्वांचे एकादशीनंतर आळंदीहून अंकलीकड प्रस्थान झाल,ठिकठिकाणी माऊलींच्या या अश्वांचे ,किणी टोल नाका ,किणी ,पेठवडगांव इथ असंख्य महिलाभगिनींनी अश्वपूजन केले.त्यानंतर उजळाईवाडी इथ ह भ प कृष्णानंद शास्ञी महाराज यांच्या निवास स्थानी मुक्काम केला.यावेळी कृष्णानंद शास्ञी महाराज यांनी स्वागत करुन माऊलींच्या अश्वाच पुजन केल.यावेळी अश्वसेवा करणारे अक्षय परीट, रामा गुदाळे, समित शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.