निंबोळी अर्क ठरेल कीटकनाशकला पर्याय- मानसी गोडसे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

निंबोळी अर्क ठरेल कीटकनाशकला पर्याय- मानसी गोडसे

ग्रामीण भागात गावोगावी कडुनिंबाची भरपूर झाडे आहेत. या झाडांना भरपूर निंबोळी असून त्या सध्या पक्व होत आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क तयार करण्याचे आवाहन कृषी कन्या मानसी मधुकर गोडसे हिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित,रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत केले .
२५ किलो निंबोळ्या जमा केल्यास त्याच्या पाच टक्के निंबोळी अर्क तयार करता येवू शकतो. निंबोळी अर्क बनवण्याची प्रक्रिया साधी-सोपी असून सोयाबीन, कापूस सारख्या पिकांवर फवारणी केल्यास कीडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. निंबोळी अर्काची फवारणी केल्यास कीडींचा खाण्याचा वेग मंदावतो. तसेच कीडींची अंडी घालण्याची गती कमी होते.पिकांच्या पानांवर निंभोळी अर्काची फवारणी केल्या मुळे पिकांची पाने कडू होतात आणि अशी पाने कीटक खाणे टाळतात आणी उपासमारी मुळे त्यांचा मृत्यू होतो.निंभोळी अर्कच्या कडू वासामुळे मादा कीटक पानांवर अंडी घालत नाहीत, त्यामुळे त्यांची पुढील पिढीच तयार होत नाही.निंभोळी अरकच्या फवारणी मुळे कीटकांत नपुसकता येते.पिकांचा वास कडू आल्यामुळे कीटक झाडांवर बसण्याचे टाळतात.
अशाप्रकारे मानसी हिनेकिड्यांवर निंभोळी अर्काचा काय परिणाम होतो?निंभोळी अर्काचे काय फायदे आहेत?फवारणी केव्हा करावी? याची माहिती कान्हापुरी येथील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक घेऊन सांगितले.त्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत,प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी शेतकरी पोपट फराडे, सोमनाथ शिंदे, शुभम फराडे, संतोष फराडे इ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here