चंद्रभागेच्या पात्रात महिलेची रात्रीच्या अंधारात सहा तास मृत्यूशी झुंज

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चंद्रभागेच्या पात्रात महिलेची रात्रीच्या अंधारात सहा तास मृत्यूशी झुंज

(कोळी बांधवांनी एकत्र येत वाचवले महिलेचे प्राण)

सोलापूर // प्रतिनिधी

काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती याची प्रचिती कालनिर्णय गेला एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरात चंद्रभागेत स्नान व विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या महिला भाविक सौ कांता नारायण भुते वय 52 वर्षे राहणार खामगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा यांना आली चंद्रभागेच्या पात्रावर असलेल्या दगडी पुलावरुन सायंकाळी सहाच्या सुमारास पाण्यात पडल्या परंतु पोहता येत नसल्याने व पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांनी दगडी पुलाच्या तेथेच पाण्यात असलेल्या दगडाला पकडून सुमारे सहा तास मृत्यूशी झुंज देत होते.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेल्या एक वर्षापासून विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे मात्र प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे एसटी बस सुरू झाली आणि वारी पोहोच करण्यासाठी वारकरी पंढरी आले पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी व वारी पोहोच करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील महिला भाविक पंढरपुरात आल्या त्यांनी विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन घेतले व चंद्रभागे स्नान करण्यासाठी चंद्रभागे कडे आल्या याठिकाणी जुना दगडी पूल आहे या पुलावरून चालत असतानाच त्यांचा तोल जाऊन ते पाण्यामध्ये पडल्या पाण्याची खोली व पोहता येत नसल्याने तेथेच असलेल्या दगडाला त्या धरून बसल्या व मदतीसाठी सायंकाळच्या सहा वाजल्यापासून आवाज देत होत्या परंतु त्यांचे आवाज कोणीही ऐकलं नाही त्यांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला आणि रात्री एकच्या दरम्यान कोळी समाजातील कृष्णा नेहत्राव हे आपल्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी दगडी पुलावरून जात असताना त्यांना एका स्त्रीचा मदतीसाठी ओरडत असलेला आवाज आला त्यांनी गीत भेट गाडी थांबवली आणि आवाज नेमका कुठून येतोय हे पाहू लागली परंतु आवाज येत होते आणि तेथे परिसरात कोणीच दिसत नव्हते तेव्हा आपला मित्र किरण यास फोन करून बोलावून घेतले व दोघांनी आवाज कुठून येत आहे याचा शोध सुरू केला तेव्हा दगडी पुल आला खालच्या बाजूला दगडाला धरून बसलेले एका स्त्रीचा आवाज येत होता त्या ठिकाणी जाण्यासाठी दोघांचेही धाडस होत नव्हते अखेर सामाजिक बांधिलकीची जाणीव होऊन दोघांनी काळजावर दगड ठेवत घाबरतच आवाजाच्या ठिकाणी मोबाईलची बॅटरी लावून बघितले असता एक महिला मला वाचवा मला वाचवा असे ओढू लागली दरम्यान दोघांनी मिळालेला वाचवणे शक्य नसल्याने आपल्या मित्रांना बोलावून घेतले व सर्वांनी मिळून सदर महिलेला पाण्यातून बाहेर काढत पुलाच्या वर आणली यावेळी महिलेला पाण्यात कसे पडला असे विचारले असता त्यांनी सांगितले की मी सात वाजण्याच्या सुमारास पाण्यात पडली आहे तेव्हापासून आवाज देत आहे परंतु कोणीही मदतीसाठी आले नाही मी खूप मोठ्याने ओरडत होते परंतु जीव वाचवण्यासाठी कोणी येत नसल्याने बा विठ्ठला पांडुरंगा तूच आता माझी रक्षा कर व माझा जीव वाचवा असा दावा करू लागले असताना बाळांनो आपण पांडुरंगाच्या रूपात येऊन माझा जीव वाचवला आहे आपल्यासारख्या पांडुरंगाचे आभार मी कधीही विसरू शकणार नाही अशी प्रतिक्रिया देताना महिलेच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि देव तारी त्याला कोण मारी असे म्हणून तिने आपला परिचय दिला सदरची घटना परिसरातील नागरिकांना समजताच महिलेचे जीव वाचवणारे कृष्णा नेहत्राव, किरण, लालू मंजुळे, अक्षय जाधव, शाहू साठे ,दीपक कदम, रोहन कोळी, गोलू जाधव या सर्वांचे आभार मानले

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here